तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक

Eka Lagnachi Tisari Goshta


"काय ह्या ईशाचे नखरे?? आईवर ओरडायला काय झालाय हिला?? त्या बिचारीला काय माहित?? जर एकांत हवा होता तर घरी यायचंच कशाला?? Change it!! .. दुसरं काहीतरी लाव..,"
- माझे पप्पा (कालचा ELTG चा एपिसोड पाहताना)

खरच आपली generation आहेच थोडी short -tempered. जरा काही मनासारख नाही झालं, कि घ्यायचं घर डोक्यावर, आकांडतांडव करायचा, आपल्याच माणसावर ओरडायचं, हे आता घराघरात चालू आहे. कुणाचा राग आपण कुणावर काढतोय याच सुद्धा भान आजकाल आपण विसरत चाललोय. त्यावेळेला ज्याच्यावर रागावलोय त्या व्यक्तीला तर डोळ्यासमोर येवूच देत नाही, मात्र त्या व्यक्तीशी related इतरांवरही आपण आपला राग दर्शवतो. 
तसं बघायाला गेल तर थोड बोलून, आपापली बाजू मांडून, विचार विनिमय करून जे पण काही वाद किंवा गैरसमज असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. परंतु आजकाल जो सगळ्यामध्ये ठासून भरलाय असा स्वाभिमानरुपी EGO(!) आपल्याला हे सगळ करू देतंच नाही. त्याच म्हणन असत कि मीच का म्हणून माघार घेवू, मीच का म्हणून सगळ सहन करू, माझ्याच बद्दल अस सगळ का घडतंय आणि इतर ROFL टाईपचे नाना प्रश्न. पण आपल्या EGO मुळे आपली माणस पण दुखावली जात आहेत हे मात्र त्यावेळेस आपण विसरतो.
काहीजानासोबत discussion केल्यावर मला अस लक्षात आल कि, हे सगळ भीतीमुळे पण होत कधीकधी. एका प्रकारची insecurity निर्माण होते मनात आणि आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर हक्क गाजवायला लागतो , पण त्यावेळी त्या व्यक्तीला काय वाटत असेल हे आपण लक्षात नाही घेत. ती व्यक्ती पण दुखावलेली असेल, त्या व्यक्तीच्या पण काही अपेक्षा असतील, त्याला पण स्वतःचे काही problems असतील.
जरा विचार करा, तुम्ही एखाद्याला जेंव्हा I Love You म्हणताय, म्हणजे तुम्ही त्याला त्याच्या चांगल्या वाईट गुणांसह आपल्या हृदयात स्थान देताय, मग तुम्ही त्याची एखादी चूक सुद्धा समजून नाही घेवू शकत?? काय नेमक आहे हे तरी कमीतकमी जाणून घ्या कि राव, अस तडकाफडकी नाती तोडून, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण लाथाडून, एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पण वागणार नाही अस त्याच्याशी वागण बर वाटत का?? 
आणि नंतर आपली चूक लक्षात आली कि मग sorry sorry चे msgs करायला परत आपण तयार, म्हणजे व्यक्ती आपल खेळण आहे, जेंव्हा वाटेल तेव्हा छातीशी कावटाळाव नको तेंव्हा फेकून द्याव. हि कसली पद्धत??
प्रत्येकाला स्वतःच स्थान आहे, प्रत्येक जन स्वतःच्या जागी योग्य आणि बरोबर आहे, प्रत्येकाला स्वतःचे विचार आहेत, आहेतच, त्याचा पुरेपूर वापर केलाच पाहिजे, पण म्हणून त्याने कसंही वागण योग्य नाही. कारण आपल्याला लोकांमध्येच राहायचं आहे, म्हणून त्यांच्याशी जुळवून घेण सुद्धा आपल कर्तव्य आहे.
nw grow up!! आपण लहान तर नाही न आता. वाद झालेच तर जरा डोक शांत ठेवा, समोरच्याचं ऐकून घ्या. कोणाच ऐकून घेतलं म्हणजे तुम्ही लहान व्हाल अस काही नाही. पण त्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटतय ते करा. after all तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक. 

( हा फक्त माझा स्वतःचा विचार आहे. आवडल तर घ्या नाही तर next please करा.)

0 comments: